जेव्हा राजस्थानात चक्क एका टरबूजावरून युद्ध पेटलं..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
राजस्थान या राज्याचा इतिहास अतिशय गौरवशाली राहिला आहे. राजस्थानच्या या धरतीवर अनेक वीरांनी जन्म घेतला. तसेच या धरतीवर अनेक लढाया देखील लढल्या गेल्या. पण आज आम्ही तुम्हाला ज्या युद्धाबद्दल सांगणार आहोत, ते युद्ध जरा विचित्र आहे.

राजस्थानच्या बिकानेर आणि नागौरच्या सेनेमध्ये एक अनोखे युद्ध झाले. हे युद्ध अनोखे याकरिता होते की त्याचं कारण अनोखं होतं. हे युद्ध एक टरबूजावरून लढण्यात आले होते. आणि त्यासाठी या दोन्ही राज्यांच्या अनेक सैनिकांनी आपले प्राण त्यागले होते.

निव्वळ एका फळाकरिता लढण्यात आलेली ही जगातील एकमेव लढाई आहे. या युद्धाला “टरबूजाचे युद्ध” म्हणून ओळखल्या जाते.
१६४४ सालची गोष्ट, तेव्हा बिकानेरवर राजा करण सिंह आणि नागौर येथे राजा अमरसिंह यांचे शासन होते. या दोन्ही राजघराण्यांनी मुघलांचे मांडलिकत्व मान्य केले होते. त्यामुळे यांचे शासक वेगवेगळ्या सैन्य अभियानात भाग घेण्याकरिता गेलेले होते.

बिकानेरचे सिलवा गाव आणि नागौरचे जाखनिया या दोन गावांच्या मध्ये या दोन राज्यांची सीमा होती. बिकानेरच्या सीमा रेषेजवळील एक टरबुजचा वेल नोगौरच्या सीमारेषा पार करत वाढला. यावर एक टरबूज देखील लागले.

आता टरबुजाचा वेल हा होता बिकानेरचा पण त्यावर टरबूज लागले नागौरच्या जमिनीवर.. मग काय या एका टरबूजावर दोन्ही राजघराण्यांनी दावा केला की त्या टरबूजवर त्यांचा हक्क आहे.

बिकानेर येथील लोकांचे म्हणणे होते की, हा वेल आमच्या क्षेत्रात उगवला आहे त्यामुळे त्या टरबूजावर आमचा हक्क आहे… तर नागौर येथील लोकांचे म्हणणे होते की, हा टरबूज त्यांच्या क्षेत्रात लागला आहे त्यामुळे यावर त्यांचा हक्क आहे. टरबूजाचा हा वाद राजमहालापर्यंत जाऊन पोहोचला आणि दोन्ही राज्यांच्या सीमा यावर युद्ध करण्यास तयार झाल्या.
या दरम्यान दोन्ही राजघराण्यांनी आपापल्या राजांना पत्र पाठवून हे प्रकरण मुघल दरबारात सोडविण्याचा आग्रह केला.

पण तिकडे दिल्लीत या प्रकरणावर कुठला निकाल येण्याआधीच बिकानेर आणि नागौर या दोन्ही सेनांमध्ये युद्ध सुरु झाले. या युद्धात दोन्ही राज्यांनी आपले अनेक सैनिक गमावले. अखेर बिकानेर राज्याने हे युद्ध जिंकले. आपल्या शेकडो सैनिकांचे प्राण गमावून बिकानेरने हे टरबूज जिंकले…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.