भारतीय कैद्यांना दुसऱ्या महायुद्धात भोगाव्या लागलेल्या नरकयातनांची आपण कल्पनाही करु शकणार नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
महायुद्ध म्हटलं की आपआपच डोळ्यासमोर उभा राहतो, तो प्रचंड नरसंहार.
मग ते कोणत्याही दोन देशांमध्ये झालेलं असो, त्यात अनेक निरपराध्यांना आपले जीव गमवावे लागतात.
आजपर्यंत जगाने दोन महायुद्धांचा सामना केला आहे.
आजच्या पिढीने ती महायुद्ध पाहिली नसली, तरी त्याच्या कथा, बातम्या, फोटो यांतून त्यची दाहकता समोर येते.
ज्या पिढ्यांनी हे महायुद्द प्रत्यक्ष पाहिलं आहे, त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर तर अंगावर काटा उभा राहतो.
मात्र या कथांमध्ये सर्वात अस्वस्थ करणारा भाग म्हणजे या युद्धामधला नरसंहार आणि अनेकांवर झालेले अत्याचार.
युद्धाच्या अशा अनेक कथा आहेत, ज्या आजपर्यंत फारश्या कुणाला ठाऊक नाहीत.
दुस-या महायुद्धाची अशीच एक कथा…
दुसर विश्व युद्ध १९३९ ते १९४५ दरम्यान झालं होतं.
या युद्धात जगातील सर्वच मोठ्या देशांनी भाग घेतला होता. हे इतिहासातील सर्वात मोठे युद्ध होते.
यात ३० देशांचे १० कोटी लोकं सहभागी झाले होते. एका बाजूला जर्मनी, जपान आणि इटली सारखे मोठे देश होते तर दुसरीकडे ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेसारख्या महाशक्ती होत्या.
त्यावेळी भारत युनायटेड किंग्डमचा गुलाम होता. याचं कारणामुळे लाखो भारतीयांना ब्रिटनकडून युद्ध लढावे लागले होते. या युद्धात ८७ हजार सैनिकांनी आपला जीव गमावला होता.
तसे तर जपानने १९४५ साली अमेरिके समोर सरेंडर केले होते तरी देखील या युद्धा दरम्यानच्या ६ वर्षांत जपानने त्याचं भयानक रूप दाखवलं.
जपानने ब्रिटीश इंडियन सोबतच इतर काही देशांच्या हजारो सैनिकांना बंदी बनवले होते. या लोकांना जपानमध्ये अमानवीय वागणूक दिली जायची.
मात्र बंदी सैनिकांकडून मुकपणे हा अत्याचार सोसला जायचा. किंबहुना त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसायचा.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपान ने सिंगापूर येथे युद्ध लढण्यासाठी गेलेल्या हजारो ब्रिटीश-इंडियन सैनिकांना बंदी बनविण्यात आले.
यामधील कित्येक कैद्यांना डोळ्यांवर पट्टी बांधून बसवल्या जायचं. त्यानंतर त्यांच्या समोर जपानी सैनिक बसायचे.
त्यानंतर या कैद्यांच्या शरीरावर एक पॉईंट सेट करण्यात यायचा, ज्यानंतर जपानी सैनिक यांना निशाणा बनवून शुटींग प्रॅक्टिस करायचे.
कोणत्याही चित्रपटातील किंवा पुस्तकातील हा अतिरंजित प्रसंग वाटत असला, तरी दुर्दैवाने ही खरी घटना आहे.
या कैद्यांना टार्गेट नंबर देखील देण्यात यायचा.
यांच्यावर निशाना लावल्यानंतर त्यांच्या शरीरात खिळ्यासारखी गोष्ट टोचून हे सुनिश्चित केल्या जायचं की त्यांच्यापैकी कोणी जिवंत तर नाही.
असा नरसंहार जगाला हादरून टाकणारा होता.
ब्रिटीश-इंडियन आर्मीसोबतच चीन, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांच्या युद्ध कैद्यांना देखील जपानने क्रूरतेने ठार केले.
या कैद्यांना गोळ्या झाडल्या नंतर त्यांचे शीर कापून टाकण्यात येत होते.
एवढचं नाही तर युद्धा दरम्यान खाण्याची सामग्री कमी पडली तर जपानी सैनिक या कैद्यांना मारून खात असत.
या महायुद्धादरम्यान स्त्रियांवर झालेल्आ अत्याचारांची तर गणनाच नाही.
या जपानी सैनिकांनी महिलांवर देखील दया नाही दाखवली. त्यांना सेक्स स्लेव बनवल्या जात असत.
त्यांच्यासोबत जबरदस्ती संबंध बनविले जायचं आणि त्या गर्भवती झाल्या की या गर्भवती महिलांवर हे जपानी वेगवेगळे प्रयोग करत असत.
यानंतरच्या कित्येक पिढ्यांना याचा त्रास सोसावा लागला आहे.
या कैद्यांना मजदूर बनविल्या जातं असत त्यानंतर त्यांच्याकडून फॅक्टरीमध्ये काम करविण्यात येत तसेच त्यांच्याकडून रेल्वे ट्रक टाकण्याचं काम देखील करविण्यात येत असत.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपानच्या Unit 731 येथे वैज्ञानिक अमानवीय प्रयोग करत असत.
माणसांना अक्षरशः गिनीपिग्जप्रमाणे वागवंल जायचं.
प्राण्यांवर केल्या जाणा-या प्रयोगांत प्राण्यांऐवजी कैद्यांचा वापर व्हायचा.
यामध्ये बहुतांशी कैद्यांचा मृत्यु हा ठरलेलाचं.
ते कैद्यांना बेशुद्ध न करता त्यांचे अंग काढायचे आणि नंतर ते दुसऱ्या ठिकाणी जोडायचे.
कैदींना शिक्षा देण्याचा हा सर्वात निर्दयी प्रकार आहे. आधी ते बांबूच्या रोपाला जमिनीत लावत, त्यानंतर जपानी या कैदींना हात बांधून त्यावर बसवत.
बांबूचे झाड खूप वेगात वाढते. त्यामुळे ते झाड कैदीला कापत वाढायचं आणि त्यात त्याचा मृत्यू व्हायचा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.