घरी मारहाण फक्त स्त्रियांना होत नाही – पुरुषांना होणाऱ्या मारहाणीचं धक्कादायक वास्तव!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्या भारतामध्ये स्त्रियांवर दरवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे अत्याचार होत आले आहेत, लग्न झालेल्या स्त्रियांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना देखील अनेकदा घडल्या आहे. आज आपला देश एवढा प्रगत झालेला असूनही, स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी होताना दिसून येत नाही, प्रत्येकवेळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची एक नवीन बातमी कानावर पडते. त्यामुळे आपल्या देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. हे कुठेतरी कमी होणे, गरजेचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने स्त्रियांवर होणाऱ्या या अत्याचारांना रोखण्यासाठी आता योग्य ती पाऊले उचलायला सुरुवात केली आहे आणि ती काही प्रमाणात यशस्वी देखील होताना दिसून येत आहे.

असो, हे तर आहेच, पण आज आम्ही तुम्हाला ह्याच्या विपरीत अशी माहिती देणार आहोत. आपल्या भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांवर अत्याचार झाल्याचे आपण खूप कमी वेळा ऐकले असेल. पण हो, कधीकधी उलट होते आणि पुरुषांवर देखील अत्याचर आणि अन्याय होतो. सध्या झी – मराठी या वाहिनीवर लागणारी ‘जागो मोहन प्यारे’ ही मालिका तुमच्यातील बहुतेक लोक पाहत असतीलच. तसेच, काहीसे घडलेले या प्रकरणांमध्ये दिसून येते.
या मालिकेतील मोहन म्हणजेच अतुल परचुरेला त्याची बायको आणि सासू कशी त्रास देते, हे तुम्ही पहिलेच आहे. त्याला यामधून वाचवण्यासाठी खुद्द परीला पृथ्वीवर यावे लागते. पण ती मालिका असल्याने, त्यात परी आली. पण खऱ्या आयुष्यात असे काही परी वाचवायला येणार आहे. आज आम्ही जे सांगणार आहोत, त्यांनी तुमच्या विचारात काही प्रमाणात फरक पडेल. चला मग जाणून घेऊया, याबद्दल संपूर्ण माहिती…

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, उत्तरप्रदेश या फक्त एका राज्यामध्ये गेल्या एका वर्षात ६,६४६ पुरुषांनी पोलीस हेल्पलाईनवर घरगुती हिंसेची तक्रार नोंदवली आहे. जे आपल्या पत्नीच्या हिसंक प्रवृत्तीला त्रासले होते.
पण स्त्रियांवर होणारी घरगुती हिंसेच्या प्रकरणांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. गेल्या एका वर्षात पत्नींकडून १ लाख ५३ हजार तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच प्रत्येक दिवशी सरासरी ४१९ तक्रारी नोंदवण्यात येतात.
यूपी – १०० ऑपरेशनला एक वर्ष होण्याच्या मुहूर्तावर या आकड्याला उघड करण्यात आले. एका वर्षामध्ये पोलिसांना ४३ लाख फोन मदतीसाठी करण्यात आले होते. ज्यामधील ७ लाख फोन हे घरगुती हिंसाचाराविषयी होते.

या आकड्यांची पडताळणी केल्यावर हे लक्षात आले की, शहरी क्षेत्रांमधून घरगुती हिंसाचाराच्या जास्त तक्रारी येतात. लखनऊ, गोरखपूर, आग्रा, अलाहाबाद यांसारख्या शहरांची नावे या यादीमध्ये सर्वात वरती येतात. सर्वात जास्त तक्रारी गोरखपूरमधील गोरखपूर कोतवाली भागामधून येतात. हा प्रदेश १६ ग्रामीण आणि १० शहरी पोलीस ठाण्यांमध्ये विभागलेला आहे.
यूपी – १०० चे अतिरिक्त महासंचालक आदित्य मिश्रा याविषयी म्हणाले की,
“आम्ही ही यादी पाच जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना देणार आहे आणि त्यांना यावर रिसर्च करून यांना शोधण्यास सांगणार आहोत. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल, त्याचबरोबर ते ६५०० पेक्षा जास्त माणसे कोण आहेत, ज्यांचा त्यांची पत्नी जाच करते, त्यांना शोधून काढणे देखील खूप मजेशीर आहे.”
यावरून समजते की, काही ठिकाणी स्त्रियांसोबताच नाहीतर पुरुषांबरोबर देखील अन्याय होतात आणि या जगात केवळ पती पिडीत स्त्रियाच नाहीत पत्नी पिडीत पुरुष देखील आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.