निरोगी राहण्याचा हा सर्वात सोपा उपाय आपण नेहेमी दुर्लक्षित करतो
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
“जल ही जीवन है…” हे वाक्य आपण नेहमीच वाचतो. पण आज आहारात पाणी हा घटक कसा आवश्यक आहे, याबाबत थोडक्यात माहीती.
आपल्या वजनाच्या ५०% ते ६०% पाणी शरीरास मिळायला हवे. सरासरी २-३ लिटर पाणी प्रतिदिवस मिळायला हवे.
त्यापैकी १% कमी झाल्यास तहानेची जाणीव होते. ५% कमी असल्यास मांसपेशीचे क्षमता कमी होते. आणि २० % कमी पाणी मृत्युस कारणीभुत ठरते.
पाण्याची कार्ये :

१) पाणी हे सार्वभौमिक विलयक (universal solvent) आहे. त्यामुळे शरारातील सर्व क्रियांमध्ये महत्वाचे ठरते.
२) शरीरातील सोडीयम, पोटॅशिअमचे नियमन करून पाणी electrolyte balance नियमित ठेवते.
३) शरीरातील पाणी शरीराचे तापमान नियमीत ठेवते.
ऊदा – ऊन्हाळ्यात शरीराचे वाढणारे तापमान घामाद्वारे कमी केले जाते.
४) तहान लागल्याबरोबर पाणी पिण्याची सवय मेंदुला कार्यक्षम ठेवते.
५) शारीरीक क्षमता वाढवण्याबाबतही पाणी महत्वाचे कार्य करते. कारण शारीरीक कष्ट करताना मांसपेशीना oxygen पुरवण्याचे कार्य पाणी करत असते.

६) पाणी पिण्याने शरीर hydrate राहते व त्वचा देखील त्यामुळे तजेलदार राहते.
७) Blood Urea Nitrogen हे महत्वाचे toxin असते. मात्र ते पाण्यात विलयीत होण्यामुळे kidneys मध्ये जावुन मुत्राद्वारे बाहेर पडते. अशाप्रकारे पाणी ऊत्सर्जनास (excretion) मदत करते.
८) योग्य प्रमाणात पाणी पिल्यास आंत्रातील क्रिया योग्यप्रकारे होतात. पाणी कमी पिल्यास मलातील पाणी आंत्राद्वारे शोषल्या जाते व बद्धकोष्ठता होते.
पाणी कमी पिल्यास दिसणारी लक्षणे :
१) सतत तहान लागणे
२) मुत्राचा रंग गडद होणे
३) ओठ व जीभ कोरडी पडणे
४) झोप न येणे
५) अन्नावर वासना न जाणे (nausea)
६) शिरःशुल (Headache)
७) भ्रमितावस्था (confusion)
८) हातपायांना मुंग्या येणे.
ही सर्व लक्षणे तर आपण पाहीलीच…
पण “पाणी योग्य प्रमाणात पिण्याची सवय कशी लावावी??”
काही छोट्या, सोप्या टिप्स :

१) लिंबु, संत्र, मोसंबी यांच्या फोडी टाकल्यास पाण्याला चव तर येतेच पण detoxification लाही मदत होते.
२) पाण्याची बाटली कायम सोबत ठेवावी.
३) पाण्याची बाटली अशी घ्यावी ज्यावर मिली लीटरच्या खुणा असाव्यात. ज्यामुळे दिवसभरात किती पाणी पिले हे कळेल. तसेच आजकाल हे track करणारे apps ही आले आहेत. ते देखील आपण वापरू शकतो.
४) जेवन करतांना आपण liquids घेवु शकतो. ऊदा. ताक
५) मधल्या वेळांमध्ये नारळपाणी, लिंबुसरबत, कोकम सरबत, ग्रीन टी यांचे सेवन करू शकतो.
आता आयुर्वेदानुसार थोडी माहीती पाहु…

पाणी पिण्याबाबत काही नियम आयुर्वेदात वर्णन केले आहेत.
१) पाणी नेहमी खाली बसुन प्यावे. अन्यथा संधीवाताचा त्रास होतो.
२) पाणी हळु हळु प्यावे.
३) झोपेतून ऊठल्यावर सर्व प्रथम पाणी पिल्यास पचनसंस्थेचे विकार होत नाहीत. त्याला “ऊषःपान” असे म्हणतात.
४) तांब्याच्या भांड्यातील पाणी अत्यंत ऊपयुक्त सांगितले आहे. रात्रभर ताम्रपात्रात पाणी ठेवुन सकाळी अनशापोटी प्यावे. त्यामुळे वात, पित्त, कफ सर्व दोषांचे प्रशमन होते.
५) तसेच गरम पाणी पिणे हे ही ऊपयुक्त असते. त्यामुळे चरबी कमी होते. तसेच थंड पाण्यापेक्षा लवकर पचन होते.
६) प्रकृतीनुसार, जेवताना कधी पाणी प्यावे यावर आयुर्वेदात विश्लेषण आहे.
वात प्रकृती :
जेवणानंतर १ तासाने पाणी प्यावे.
१/२ लिटर गरम पाण्यात ३ पुदीन्याची पाने, अर्धा चमचा बडीशेप टाकुन हे पाणी दिवसभर थोडे थोडे पित रहावे.
पित्त प्रकृती
जेवण करताना थोडे थोडे पाणी प्यावे.
१/२ लिटर गरम पाण्यात १/४ चमचा बडीशेप, २ गुलाबकळ्या, १ लवंग टाकुन दिवसभर हे पाणी पित रहावे.
कफ प्रकृती
१/२ लिटर गरम पाण्यात ३ तुळशीची पाने, अद्रकाचे २ बारीक काप, १/४ चमचा, जीरे, १/२ चमचा बडीशेप टाकुन दिवसभर हे पाणी पित रहावे.
या सर्व माहीतीचा समावेश तुमच्या दैनंदिनीत केला तर शरीर नक्कीच निरोगी राहील.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.