चला जगूया Healthy : भाग १
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
कमीत कमी आजारी पडणं म्हणजे healthy जगणं असा बऱ्याच जणांचा समज असतो , परंतु हे किती खरं किंवा healthy असण्याला अजून काही बाजू आहेत का ? हे पडताळून पाहणे खूप गरजेचं आहे. हा नुसता विचार सुद्धा मनात येणे म्हणजे तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं आहे हे नक्की.
चला जाऊयात ह्या healthy जगण्याच्या प्रवासाला….हि एक series आहे आणि आपण ह्या series मध्ये जास्तीत जास्त healthy राहण्याचे concepts पाहणार आहोत.

प्रथम जाणून घेऊ healthy जगण्याची ४ मुलतत्व
१. नियमित व्यायाम
२. positive विचारसरणी
३. शांत झोप ( ७-८ तास )
४. संतुलित आहार
वरील ४ पैकी आपण पाहतो कि सगळेच लोक संतुलित आहार ह्या बद्दल चर्चा करतात परंतु ह्या चारही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.
भारतामध्ये तसं health कडे proactive (उत्तरलक्षि ) दुष्टीने बघणारे लोक खूप कमी किंवा कोणी सांगितले तरी त्याला तेवढ seriously follow करणारे कमी.

आपण जर आजारी पडलो तर आपण डॉक्टर कडे जातो आणि antibiotics घेऊन येतो. परंतु आपण कधी हा विचार करत नाही कि आपण आजरी का पडलो ? अर्थात त्याची कारणं बरीच असू शकतात आणि माणसाने आजारी पडलंच नाही पाहिजे हे म्हणणं नाही, परंतु असा विचार करून आजारी पाडण्याचं मूळ कारणच न शोधणे हेच नेमकं घातक ठरत आणि नंतर भयंकर आजार होतात.
आपण बऱ्याच वेळेला ऐकतो कि अमुक माणसाला काहीही सवयी नव्हत्या, तो अगदी तंदुरुस्त होता परंतु त्याला काहीतरी मोठा आजार झाला पण तो कशामुळे झाला किंवा त्याची सुरुवात कशी झाली ह्याकडे बघणारे लोक खूप कमी , doctors मध्ये हि जिज्ञासा दिसते आणि ते त्याची पडताळणी पण करतात , परंतु आपल्यासारख्या सामान्य माणसाने सुद्धा त्यात लक्ष घालणे हे तितकंच महत्वाचं आहे.
Healthy असण्याची दुसरी बाजू म्हणजे नुसताच तुम्ही कमी आजारी पडता असा नाही तर तुम्ही सर्वांगाने ( शरीर आणि मन) किती healthy आहात हेही तेवढाच महत्वाचं आहे.

दुसरी महत्वाची वाजू म्हणजे भारतामध्ये औषधांची सहज उपलब्धता , म्हणजे तुम्ही medical मध्ये जाऊन सहज बऱ्याचशा गोळ्या औषधी विना prescription च्या घेऊन येऊ शकता आणि हेच नेमकं घटक ठरतं बऱ्याच वेळेस कारण आपण antibiotics घेऊन त्या त्रासाला तात्पुरतं थांबवतो खरं पण त्याचे हळू हळू होतात आणि नंतर एका मोठ्या आजारात त्याचं परिवर्तन होतं. हे प्रत्येक वेळी होताच असं नाही पण आपण नेहमी डॉक्टर कडे न जाता औषधं कि नक्कीच त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात. त्यामुळे शक्यतो आपल्या मानाने औषधं घेणे टाळावे,
कारण प्रत्येक आजराच्या वेळी शरीराची जैविक परिक्षिती वेगळी असते आणि ती तपासूनच doctors औषधी देतात.

तर या सदरचा message असा कि healthy राहणं हे सर्वांगीण महत्वाचं आहे आणि ते आपल्याच हातात आहे.
पुढील सदरात पाहुयात ४ तत्वांबद्दल..!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.