' साल १९२१ : चलाखीने लपवला गेलेला हिंदूंचा नृशंस नरसंहार… – InMarathi

साल १९२१ : चलाखीने लपवला गेलेला हिंदूंचा नृशंस नरसंहार…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम 

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

लेखक : मल्हार पांडे

===

गोष्ट १९२१ ची आहे, भारतभर खिलाफत चळवळ चालू होती, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम ओटोमान मधील खलिफा साठी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करत होते.

हळू हळू करत या सगळ्याची दिशा ब्रिटिशांपासून ते हिंदूंकडे वळली आणि याचा सर्वात वाईट पडसाद हा केरळ मध्ये दिसला. ही गोष्ट आहे १९२१ च्या मलबार मध्ये झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराची.

ज्या वेळेस संपूर्ण भारतातले क्रांतिकारी स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा काही धर्मांध लोक हे ओटोमान मधील खलिफाच्या अधिकारासाठी आंदोलन करत होते.

जेव्हा ब्रिटिशांनी या धर्मांध लोकांविरुद्ध कार्यवाही करायला सुरवात केली, तेव्हा ह्या खिलाफत चळवळीने एक भीषण रूप धारण केले आणि हिंदूंच्या कत्तली चालू झाल्या.

 

malabar massacre inmarathi1
malhardpandeyfacebookwall

 

१९२१ च्या ऑगस्ट मध्ये केरळ च्या मलबार जिल्ह्यात मोप्लाह मुसलमानांनी हजारो हिंदूंची कत्तल केली, ती कशी हे पाहुयात पण त्या आधी जरा या मोप्लाह मुसलमानांचा इतिहास पाहुयात.

१८३६ ते १९२० पर्यंत यांनी मलबार भागातील अनेक हिंदूंच्या कत्तली केल्या, बायकापोरं पळवून नेली, स्त्रियांवर अत्याचार केले! का? यांच्याबद्दल धाक निर्माण व्हावा म्हणून.

यांची इच्छा अशी होती की या मलबार जिल्ह्यात पूर्णपणे इस्लामिक राज्य असावं आणि या साठी त्यांनी हे केलेले आहे, या कत्तलिंचे कौतुक खलिफाच्या च्या मौलानाने सुद्धा केले आहे. आणि उदाहरण पण दिले, की आपल्याला असे लोक हवे आहेत जे धर्मासाठी काफिरांना मारतात आणि तिकडे इस्लाम चे राज्य स्थापन करतात!

आता येऊयात मूळ घटनेकडे. ऑगस्ट पासून चालू झालेला नरसंहार हा अनेक महिने चालला, ऑगस्ट मध्ये पहिल्यांदा १०० पेक्षा जास्त हिंदूंची घर रात्रीतून जाळली गेली, झोपेत असलेले हिंदू पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलं ह्या धर्मांध लोकांनी जाळून टाकले.

आपल्याला वाचून जर तो क्षण भयाण वाटत असेल तर विचार करा त्या लोकांना काय झालं असेल….

या जाळाजाळी मुळे हिंदूंमध्ये एक भय निर्माण झाले आणि काही हिंदूंनी घाबरून इस्लाम धर्म स्वीकारला. जसं पूर्वी पासून चालू होतं तसंच, एकतर इस्लाम स्वीकार नाहीतर मरा! साधारण १००० एक हिंदू इस्लाम मध्ये गेले पण काही निडर हिंदू हे ह्या मोप्लाहच्या विरोधात उभे होते.

 

malabar massacre inmarathi3
livemint.com

 

पण त्यांना थोडं माहित होतं की पुढे जाऊन ते अश्या गोष्टीला सामोरे जाणार आहेत जी त्यांनी त्यांच्या वाईटातल्या वाईट स्वप्नामध्ये सुद्धा पाहिली नसेल…..

२४ ऑगस्ट १९२१ ला थुवूर गावाच्या जवळ एका टेकडीवर जवळपास ४००० इस्लामिक धर्मांध लोक गोळा झाले, त्या वेळेला यांचे नेतृत्व करत होता चम्ब्रासेरी इम्बईची कोया थंगल.

त्याच टेकडीवरील एका झाडाखाली जवळपास ४० लोकांना घुडग्यावर बसवले गेले, त्यांचे हात पाय बांधलेले होते, या ४० लोकांना शिक्षा सुनावली जाणार होती,का? कारण हे हिंदू होते आणि ह्या धर्मांध लोकांच्या विरुद्ध ह्यांनी आवाज उठवून काही प्रमाणात इस्लामिक राजवट मलबार मध्ये आणण्यापासून रोखले होते.

 

malabar massacre inmarathi5
thedharmadispatch.com

 

संपूर्ण ४००० लोकांसमोर यांच्यावर असलेले आरोप मोठ्याने बोलून दाखवले गेले आणि एक एक करत यांना मारायला सुरवात केली. पहिल्या तीन लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार मारण्यात आले, पण पुढच्या सदतीस लोकांची हत्या हि अक्षरशः भयानक रित्या केली गेली.

टेकडी जवळ असलेल्या एका विहरी जवळ एकेकाला नेले गेले आणि त्यांना एका दगडावर बांधले गेले,आणि कत्तल करणाऱ्या नराधमाने त्यांची मुंडकी उडवायला सुरवात केली.

मृत झालेल्या व्यक्तींचे शव हे ह्या विहरीत फेकले गेले. काही जणांच्या मुंडक्यावर पूर्ण वार बसला नाही आणि त्यांना अर्धमेल्या स्थितीत त्या विहिरीत फेकले गेले.

त्या विहरीत पाणी नव्हते, खाली फक्त दगडं होती आणि वरती येण्याला कोणताही मार्ग नव्हता,अश्यात जे अर्धमेले लोक होते, ते कसे बसे करत तीन दिवस जिवंत राहिले.

 

malabar massacre inmarathi4
malharpandeyfacebook

 

जे लोक त्या विहरी जवळून जात होते त्यांना मदतीची हाक ऐकू येत होती पण ह्यांना मदत केली तर आपली पण अशीच अवस्था होईल म्हणून लोकांनी घाबरून विहरीत पडलेल्या लोकांना मदत केली नाही.

ह्या प्रसंगाने संपूर्ण मलबार गावात एक भयाचे वातावरण निर्माण झाले आणि येत्या काळात वारियन कुन्नाठु कुंजाहमद हाजी याने या मोप्लाह हत्याकांडाचे नेतृत्व घेतले.

जवळपास २५०० हिंदू स्त्रिया मुलं बाळ या प्रसंगानंतर मारली गेली, बायकांवर बलात्कार झाले आणि जवळपास ३०००० हिंदूंना बळजबरी इस्लाम स्वीकारायला भाग पडले गेले.

गरोदर स्त्रियांच्या पोटात चाकू खुपसून मारण्यात आले आणि त्यांचे शव हे रस्त्यावरच तसेच पडलेले होते, लहान बाळांना सुद्धा ह्या नराधमांनी सोडलं नाही! आणि अश्यात पुढील काही काळात राजकीय वक्तव्य देशातल्या तथाकथित बड्या नेत्यांकडून आली…..

हा प्रसंग जितका भयानक आहे त्याहून भयानक या पुढच्या गोष्टी आहे, या हत्याकांडावर गांधीजी एकच वाक्य म्हणाले,“MY MUSLIM BROTHERS HAVE GONE MAD”

अहिंसेचे पुरस्कर्ते असलेले गांधीजीनी यावर कोणतेही आंदोलन केले नाही अथवा हिंदूंच्या बाजूने एकही शब्द बोलले नाहीत उलट त्यांनी हा प्रसंग ब्रिटिशांविरुद्ध ची चळवळ आहे असे सांगून तुष्टीकरणाचे राजकारण केले.

या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘PAKISTAN or THE PARTITION OF INDIA ‘ या पुस्तकात,चॅप्टर नं.३ च्या तिसऱ्या भागात गांधीजींच्या ह्या दुतोंडीपणावर घणघणती टीका केलेली आहे. आणि ते या प्रसंगाला “INHUMAN UNCONTROLLED SAVAGERY ‘ असं म्हणून संबोधतात.

 

gandhi-ambedkar-inmarathi
newsgram.com

 

पुढे जाऊन ANNIE BESANT यांनी या इस्लामिक धर्मांधांवर जोरदार टीका केली. त्यात त्या म्हणाल्या ‘इस्लामिक राजवट भारतात आणि भारतातील लोकांना काय करू शकते हे आपल्याला मलबार प्रसंगातून दिसले आहे. असे कुठेही घडू नये याची पूर्णपणे काळजी घ्यावी आणि अश्या धर्मांध लोकांना वेळेस शिक्षा देण्यात यावी’.

पण येत्या काळात हे वाक्य इतिहासाच्या पानात कुठेतरी दबून गेलं…जेव्हा केरळ मध्ये १९५७ ला इ एम स दिरीपाड यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सत्ता स्थापन झाली तेव्हा ह्या मलबार हत्याकांडात ज्यांनी म्हणून भाग घेतला होता त्यांना ह्या सरकार ने पेन्शन चालू केले.

दुर्दैवाने ह्या संपूर्ण प्रसंगाला आपल्या देशातल्या इतिहासकारांनी आणि नेत्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणापोटी, मलबार चे ब्रिटिशांविरुद्धचे बंड म्हणून संबोधले आणि हा संपूर्ण हिंदूंचा नरसंहार पुसून टाकला.

असे अनेक अनेक प्रसंग आहेत ज्यात धर्मांध लोकांमुळे हिंदूंना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे.

२००२ च्या गोध्रा हत्याकांडाचा वापर करून हिंदूंना शिव्या घालणारे लोक सोईस्कर रित्या मलबार, काश्मीर मध्ये झालेल्या लाखो हिंदूंच्या हत्याकांड विसरून जातात! पण आपल्या हातात आहे योग्य रित्या योग्य ती माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवणे!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?