' भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या अंतराळातील सफरीविषयी…! – InMarathi

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या अंतराळातील सफरीविषयी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताने चांद्रयान, मंगळयान सारख्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत. आज अवकाश संशोधनात जगभरात भारताचे मोठे नाव झालेले पाहायला मिळते.

भारतीय अवकाश संशोधनाचा विषय निघाला की, दोन नावं अगदी प्रकर्षाने आठवतात. एक कल्पना चावला आणि दुसरं अर्थातच, राकेश शर्मा!!!

राकेश शर्मा हे नाव ऐकल्यावर आपल्याला भारतातील ती व्यक्ती आठवते जिने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यांच्या याच कामगिरीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत हा जगातील १४ वा देश ठरला आणि भारताने जागतिक पटलावर आपली छाप सोडली.

अवकाश संशोधनातील यशाकरिता ती एक अत्यंत महत्त्वाची पायरी ठरली. 

चला मग आज आपण, जगाच्या इतिहासामध्ये स्वत:चे आणि आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदविणाऱ्या या ग्रेट व्यक्तिमत्त्वाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया!

 

rakesh-sharma-marathipizza00

स्रोत

 

१३ जानेवारी १९४९ रोजी जन्मलेले राकेश शर्मा मुळचे पंजाबचे! मात्र त्यांचं शालेय आणि कॉलेजजीवनातील शिक्षण हैदराबाद येथे पूर्ण झालं.

नॅशनल डिफेन्स अकादमी म्हणजेच एनडीएमध्ये त्यांना १९६६ साली प्रवेश मिळाला. राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमी मधून पास झाल्यानंतर, १९७०मध्ये तेभारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले.

 

rakesh-sharma-marathipizza01

स्रोत

एक टेस्ट पायलट असल्याकारणाने पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

२० सप्टेंबर १९८२ रोजी इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली.

 

rakesh-sharma-marathipizza02

स्रोत

२ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले.

ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले. राकेश शर्मा यांच्या बरोबरीने युरी मालिशेव आणि गेनाडी स्ट्रेकलोव्ह हे दोघे होते.

 

rakesh-sharma-marathipizza03

स्रोत

या मोहिमेत राकेश शर्मा यांची भूमिका होती शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे. ज्यात बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले.

या अवकाश संशोधनामुळे भारताचे या क्षेत्रात फार मोठे नाव झाले आहे.

अंतराळात असताना सर्व मोहीमवीरांनी थेट अंतराळातून रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.

 

rakesh-sharma-marathipizza04

स्रोत

या वेळेस इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना प्रश्न विचारला की

अंतराळातून आपला भारत कसा दिसतो?

तेव्हा राकेश शर्मा म्हणाले,

सारे जहॉं से अच्छा!

त्यांचे हे उत्तर ऐकून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. त्यांना देशाचा किती अभिमान वाटतो, हे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे.

मोहिमेवरून परत आल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच भारत सरकारने देखील अशोक चक्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

 

 

पहिला भारतीय अंतराळवीर ठरलेला हा हिरो, १९८७ साली विंग कमांडर पदावरून निवृत्त झाला. अर्थात, त्यानंतर हिंदुस्थान एरॉनॉटिकस लिमिटेड म्हणजेच HALमध्ये चीफ टेस्ट पायलट म्हणून त्यांची निवड झाली.

नाशिक आणि बंगलोरमध्ये ते त्यांच्या सेवेत रुजू होते. अखेर २००१ साली त्यांनी संपूर्ण निवृत्ती स्वीकारली.

 

आज वयाच्या सत्तरी नंतरही राकेश शर्मा अंतराळातील आपली ती अद्भुत सफर विसरलेले नाहीत. त्या आठवणी आजही अंतराळातील त्या अढळ ताऱ्यांप्रमाणे त्यांच्या मनाच्या पटलावर अढळ स्थान कमावून बसल्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?