' बाजारात 5G फोन्स आलेत खरे, पण 5G म्हणजे काय आणि खरच ते आवश्यक आहे का? – InMarathi

बाजारात 5G फोन्स आलेत खरे, पण 5G म्हणजे काय आणि खरच ते आवश्यक आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सॅमसंग, क्वालकम, मिडियाटेक, व्हीवो, अप्पो आणि वनप्लस यासारख्या मोबाईल कंपन्यांनी २०१९ पर्यंत  फोन बाजारपेठेत दाखल होतील अशी घोषणा देखील केली आहे.

आणि बघता बघता हे 5G फोन्स आता मार्केट मध्ये आले देखील, आणि लोकांनी ते खरेदी करायला सुद्धा केले!

काय आहे 5G फोन? भारत खरच या नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करण्यास सज्ज आहे का? सेल्युलर फोनच्या बदलत चाललेल्या प्रवासात भारत नेमके कुठे उभा आहे?

 

5g phones inmarathi
BGR india

 

इतक्यातच आपलयाला 5G फोन वापरण्याची गरज आहे का?

तुम्ही या बदलासाठी सज्ज असा अगर नसा पण 5G फोन भारतात आता येऊन ठेपले आहेत! 

आणि पुढची काही वर्षतरी तुमच्या कानात 5G फोन हा शब्द सतत गुंजत राहणार आहे. सेल्युलर फोनच्या या नेक्स्ट जनरेशन बद्दल आत्ता तुम्हाला बरेच काही ऐकायला मिळेल.

 

5G inmarathi
Digital Trends

 

मोबाईल क्षेत्रातील बड्याबड्या कंपन्या हा फोन बाजारपेठेत आणण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. परंतु, भारतात ही सेवा किती प्रमाणात पोचेल, कशी पोचेल, याबद्दल आपल्याला काही चर्चा तरी नक्कीच करायला हवी.

सतत काही न काही बदलत असलेल्या सध्याचा काळात मोठा परिणाम होईल आणि फार चर्चा होईल असा बदल म्हणजे 5G तंत्रज्ञान!

5G तंत्रज्ञान असलेले मोबाईल फोन्स २०१९ च्या शेवटी किंवा २०२० च्या सुरुवाती पर्यंत बाजारपेठेत दाखल होतील असं भाकीत होतं,आणि त्याप्रमाणे ते घडलं देखील!

विवो, सोनी, सॅमसंग अशा कंपन्यांनी त्यांचे फोन्स बाहेर बाजारात विकायला सुद्धा काढले आहेत, कित्येक जाहिरातींमधून आपल्याला ते समजलं असेलच! 

मागील प्रगत तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे नवे तंत्रज्ञान देशात फारच वेगाने दाखल होत आहे.

 

5g-network-speeds. inmarathi
PhoneArena

 

सेल्युलर फोनच्या तंत्रज्ञानाच्या विकासातील पाचवा टप्पा म्हणजे 5G तंत्रज्ञान, यामुळे मोबाईलवरील डाऊनलोडिंग आणि अपलोडिंगचा स्पीड वाढणार असून, सोबतच नेटवर्क कनेक्ट होण्याचा स्पीड देखील वाढणार आहे.

5G तंत्रज्ञानामुळे  डाऊनलोडिंगचा स्पीड १Gbps ने वाढणार आहे.

जे सध्याच्या स्पीडच्या शंभरपट अधिक असेल.

सरळसाध्या भाषेत सांगायचे झाल्यास, 5G मुळे अव्हेंजर्स किंवा इनफिनीटी वॉरचे एचडी व्हर्जन डाऊनलोड करण्यास तुम्हाला अगदी काही सेकंदाचा कालावधी पुरेसा आहे.

तुम्ही जर हे चित्रपट ऑनलाईन पाहणार असाल तर नेट वरील बफर टाईम अगदी कमी असेल.

5G मुळे फ्रीक्वेन्सी वाढली असून नेटवर्क कंजेशन सारख्या समस्या उद्भवणार नाहीत. किंवा त्यांच प्रमाण निश्चितच कमी होईल!

जागतिक बाजार पेठेत सध्या लॉंच होणाऱ्या सर्व मोबाईलमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध असणार आहे. भारतात सुद्धा आता याची सुरुवात झाली असून बरेचसे नवीन फोन हे 5g सपोर्टेड आहेत!

 

5g internet inmarathi
Tech.in

 

२०१९ मध्येच यासाठीच्या स्पेक्ट्रमच्या लिलावाची कामे पार पडली होती. त्यामुळेच तर २०२० पासून हे फोन्स बाजारपेठेत यायला सुरुवात झाली!

या आधुनिक तंत्रज्ञानाचे सरकारकडून सुद्धा जोरदार स्वागत झाले, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलरचा व्यवहार होण्याची शक्यता वर्तवली गेली.

रिलायन्सला देखील आता ही सुविधा पुरवणार असल्याचं ऐकिवात आहे!

अमेरिका आणि काही प्रमुख देशांसह, चीन आणि जपान देखील २०१९ मध्ये 5G ने बाजार काबिज करायला सुरुवात केली आहे. आणि भारतात सुद्धा त्याची सुरुवात झाली आहे!

नवे तंत्रज्ञान वापरण्यासाठी नवा मोबाईल हँडसेट घेणे गरजेचे आहे का? तर हो. जेंव्हा 3G चे 4G मध्ये अपग्रेडेशन झाले तेंव्हा ग्राहकांना चांगल्या स्पीडची सेवा अनुभवण्यासाठी 4G सीम आणि 4G हँडसेट घ्यावे लागले होते.

 

smartphones inmarathi
pocket lint

 

आत्ताही अजून चांगल्या स्पीडची सेवा अनुभवण्यासाठी सीम आणि फोन दोन्ही बदलावे लागतील.

सॅमसंग, क्वालकम, मिडियाटेक, व्हीवो, अप्पो आणि वनप्लस, मोटोरोला सारख्या सर्व कंपन्या बाजारात 5G हँडसेट हळू हळू आणत आहेत!

खरे तर सर्व प्रगत तंत्रज्ञान भारतात उशिराने पोहोचते अशी परंपरा आहे. अजूनही आपण 4G नेटवर्कच्या ऑफरसाठी झगडत आहोत. खरेतर भारतातील 4G नेटवर्कचा स्पीड अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे.

भारतात २०२२ पर्यंत 5G तंत्रज्ञान पूर्णतः अवलंबले जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता, पण २०२० च्या मध्यावरच आधीच या ५जी ने बाजार काबिज केला आहे!

भारतात 4G तंत्रज्ञानाचा प्रभाव गेल्या दोन वर्षात वाढला आहे.

भारतात एअरटेल आणि आयडियाने 4G सेवा सर्वात आधी आणली तरी, रिलायंसने जिओ लॉंच केल्यानंतरचा भारतात 4Gचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला.

सरकारद्वारे चालवल्या जाणार्या BSNL कंपनीने अगदी काही महिन्यापूर्वी 4G सेवा सुरु केली आहे. फक्त BSNLच नाही तर भारतातील इतर ब्रॉडबँड कंपन्यांना देखील अजून चांगली 4G सेवा देता आलेली नाही.

नेटवर्क कंजेशन, कॉल ड्रॉप, स्लो कनेक्टीव्हिटी सारख्या समस्या अजूनही आहेतच.

 

bsnl inmarathi

 

अजूनही डाऊनलोडींग किंवा अपलोडींग स्पीड खऱ्या अर्थाने 4G दर्जाचा नाहीये. हा विषय झाला स्पेक्ट्रमचा. भारतातील चीप तयार करणाऱ्या कंपन्यांची अवस्था याहून फारशी वेगळी नाही.

स्मार्टफोनमध्ये 5G तंत्रज्ञान वापरण्यासाठी या तंत्रज्ञानाला साजेशी चीप स्मार्टफोन मध्ये असणे गरजेचे आहे. आणि सध्याच्या स्मार्टफोन कंपन्या 5G तंत्रज्ञान लवकरात लवकर लोकांच्या हातात पडाव यासाठी प्रयत्न करतायत!

अजूनही सगळे फोन्स नसले तरी काही कंपन्यांनी हे तंत्रज्ञान त्यांच्या फोन मधून द्यायला सुरुवात केली आहे, आणि २०२० च्या अखेरपर्यंत नक्कीच हे प्रमाण वाढेल! 

 

iphone inmarathi
livemint

 

अॅपलचे उदाहरण घेतल्यास, ही कंपनी 5G मॉडेल अनन्यास फारशी सज्ज झालेली दिसत नाही. कारण, त्यांच्या लेटेस्ट आयफोनला अजिबात चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.

काही महिन्यांपूर्वीच गुगलने देखील 3 pixel लॉंच केला आहे, गुगल आत्ता 4pixel लॉंच करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे गुगल लवकरात लवकर 5G हँडसेट आणेल याची शक्यता कमी आहे.

 

mobile shops inmarathi
quora

 

मात्र क्वालकम चीप वापरणाऱ्या सॅमसंग, वनप्लस, मोटोरोल यासारख्या कंपन्यांनी आपले नवीन 5G हँडसेट बाजारात आणायला सुरुवात केली आहे!

भारत सज्ज असो किंवा नसो 5G ने आत्ताच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे!

क्वाल्कम आणि त्यांचे इतर सहकारी यासाठी आवश्यक असणारा पाया कसा उभारतात हे जाणणे नजीकच्या भविष्यात जास्त गरजेचे आहे, जे सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?