' इस्लाम+ख्रिश्चनांच्या हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही हिंदूधर्म टिकून राहण्याचे कारण काय? वाचा – InMarathi

इस्लाम+ख्रिश्चनांच्या हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही हिंदूधर्म टिकून राहण्याचे कारण काय? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म जगभर मोठ्या प्रमाणात पसरले. भारतातही या धर्माने आपले स्थान निर्माण केले मात्र यापैकी एखादा धर्म देशभर पसरला असे झाले नाही.

इस्लामच्या नावाने भारतावर अनेक आक्रमणे झाली पण तरीही हिंदू धर्म टिकला आणि वाढला.

याचे कारण काय आहे असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. त्याचे विश्लेषण अनेक अंगाने केले जाते. असेच हे एक विश्लेषण आहे.

भारतावर आक्रमणास सुरुवात झाली ती इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात! भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला मोठ्या लढाया झाल्या.

उमायद खिलाफत (खिलाफा अल-उमाविय्या) ही मध्यपूर्वेतील खिलाफत होती. या खिलाफतीचे सत्तास्थान सिरियाच्या दमास्कस शहरात होते.

आता हे आक्रमणकर्ते राज्यविस्तारासाठी आले होते त्याचा धर्माशी संबंध काय? तर उमायद खिलाफत मधील खिलाफत म्हणजे काय ते समजवून घेऊ.

 

Mughal Barbarism and Islamic Savagery in India - inmarathi

 

खिलाफत ही इस्लाम धर्मातील सर्वांत पहिल्या राजकीय-धार्मिक शासनव्यवस्थेस उद्देशून वापरली जाणारी संज्ञा आहे. “प्रेषिताचा वारस” असा अर्थ असणाऱ्या खलीफा या शब्दापासून खिलाफत ही संज्ञा निर्माण झाली.

या शासनव्यवस्थेत खलीफा व त्याला साहाय्य करणारे अन्य अधिकारी जगभरातील इस्लामधर्मीयांचे प्रतिनिधी मानले जातात व ते शरिया या इस्लामी धार्मिक व राज्यशासनविषयक कायदेप्रणालीनुसार राज्यसत्ता सांभाळतात.

सैद्धान्तिक व्याख्येनुसार या राज्यपद्धतीला “सामंतिक-राज्यघटनाधारित (म्हणजे मदीनेच्या राज्यघटनेनुसार चालणारे) प्रजासत्ताक प्रकारची राज्यव्यवस्था मानले जाते. 

इ.स. ७१२ मध्ये सिंध प्रदेश अरबांनी जिंकल्यानंतर सिंधूच्या अजून पूर्वेकडे राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले.

इ.स. ७२४ ते ८१० च्या दरम्यान उत्तरेकडील गुर्जर-प्रतिहार सम्राट नागभट्ट पहिला, दक्षिणेकडील चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा व इतर लहान भारतीय राज्ये यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या अरबांशी संघर्ष झाला.

उत्तरेकडे सम्राट नागभट्टाने माळव्यावर चाल करून येणाऱ्या महत्त्वाच्या अरब मोहिमेचा पराभव केला तर दक्षिणेकडून विक्रमादित्याने आपला सेनानी पुलकेशी याला पाठवले.

पुलकेशीने गुजरातमध्ये अरबांचा पराभव केला. इ.स. ७७६ मध्ये सैंधव नाविक दलाने अरबांच्या नाविक मोहिमेचा पराभव केला.

या पराभवांमुळे अरबांचा पूर्वेकडील राज्यविस्तार संपुष्टात आला व नंतर सिंधमध्येच अरब राज्यकर्त्यांचा पाडाव झाला.

 

neval-war-inmarathi

 

इस्लामचा विस्तार युरोप, अफ्रिका या ठिकाणी झाला, परंतु ते पश्चिमेला अटलांटिक आणि पूर्वेस सिंधु नदीत थोपवले गेले.

केवळ सिंध प्रांतच त्यांच्या शासनाखाली होता आणि आश्चर्याची गोष्ट नाही की, पाकिस्तानच्या निर्मितीला महत्त्वाची गती तेथेच आली.

पुढे काळ सरकला तसा गझनीचा महमूद हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता.

याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या व अपार संपत्तीची लूट करून तो परतला. परंतु त्याचे शासन आजच्या भारतात विस्तारले नाही.

यानंतर महंमद घौरी हा उत्तर भारतातील मुस्लिम राज्याचा संस्थापक होता. घुर किंवा घोर या तुर्की राजघराण्यात त्याचा जन्म झाला. मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होता.

महाराज पृथ्वीराज चौहान हे दिल्ली येथील पराक्रमी राज्यकर्ते होते.

महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले.

अखेरीस महंमद घोरी ने पृथ्वीराज चौहान यांचा थानेसर येथील लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनतीची सुरुवात केली. भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर झाली.

त्यांची सद्दी इ.स. १२१० पासून इ.स. १५२६ पर्यंत होती. यांत दिल्ली सल्तनतीत असलेल्या अनेक घराण्यांनी राज्ये केली.

 

mohammad-inmarathi

हे ही वाचा – पालघरचे साधू, हिंदूंचा थंडपणा आणि खोटा सर्वधर्मसमभाव!

दिल्लीमध्ये मजबूत झाल्यानंतर, त्यांनी १३ व्या शतकात ते दक्षिणेकडे वळले आणि वरंगळ (त्यांनी कोहिनूर आणि वरंगळ येथून इतर सर्व मौल्यवान दागिन्यांचा कब्जा केला), मदुराई आणि बेलूर यासारखे शहर लुटले.

दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या ‘हरिहर व बुक्क’ या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली.

इ .स. १३२३ मध्ये वरंगळचे राज्य तुघलकने जिंकले. त्यावेळी हरिहर आणि बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले.

काही दिवसांनी त्यांची सुटका करून तुघलकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिणेकडे पाठविले.

तेथे त्यांनी इ .स १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून तिला शृंगेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले.

हे एकूण पाच भाऊ होते. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे या भावंडांचे ध्येय होते. या भावंडांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते.

गनपावडरचा वापर करणारे ते भारताचे प्रथम साम्राज्य होते आणि त्यांचा उपयोग तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण होता.

 

vijaynagar-cover-inmarathi

 

तथापि, नंतर अंतर्गत कलहांमुळे या साम्राज्याचा शेवट झाला. अर्थात साम्राज्याचा शेवट झाला असला तरी या राजघराण्यातील काही जण दक्षिण दिशेला गेले आणि राज्य स्थापन केले.

उदाहरण द्यायचे झाल्यास  श्रीलंकेतील कँडीचे नायक राजघराणे.

त्याच सुमारास इकडे उत्तरेत हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमचंद्र भार्गव (इ.स. १५०१ – इ.स. १५५६) हा इ.स.च्या १६ व्या शतकातील उत्तर भारतातला एकमेव हिंदू सम्राट होते.

राजस्थानातल्या अलवार जिल्ह्यामधील ब्राह्मण पुरोहिताचा मुलगा, पुढे एक मीठ विक्रेता म्हणून जीवनाला सुरुवात केलेला हेमू, आपल्या कर्तबगारीने सूरी वंशाच्य़ा आदिल शाह सूरी चा सेनापती व प्रधानमंत्री या पदांपर्यंत पोहोचला.

उत्तर हिंदुस्तानात पंजाबपासून बंगालपर्यंत त्यांनी अफगाण बंडखोर, हुमायून व अकबराच्या मुघल फौजा यांच्याशी सुमारे २२ लढाया एकदाही पराभूत न होता जिंकल्या.

इ.स. १५५६ साली त्यांचा ’सम्राट विक्रमादित्य’ या पदवीसहित दिल्लीच्या सिंहासनावर राज्याभिषेक करण्यात आला.

सुमारे ३५० वर्षांनंतर त्यांनी हिंदू साम्राज्याची थोड्या काळासाठी का होईना, पुनःस्थापना केली.

मात्र त्यानंतर लगेचच झालेल्या पानिपतच्या दुसर्‍या लढाईत केवळ दुर्दैवाने अकबराच्या मुघल सैन्याकडून  पराभव झाला.

 

hemu-inmarathi

 

मुघल साम्राज्याचे अकबर पूर्वी असणाऱ्या राजांच्या तुलनेत अकबर काळात हिंदूंशी थोड्या सहनशीलतेने वागले आणि धार्मिक परिवर्तन कमी होते.

यामुळे काही काळ इस्लाम आणि हिंदू यांच्या संबंधात जवळजवळ एक शतक शांतता लाभली.

अकबरचा नातू औरंगजेबाने हिंदूंच्या विरूद्ध नव्याने लढाई सुरू केली तेव्हा पुन्हा हिंदूचा लढा परत सुरू झाला. १६४२ नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने युद्ध सुरू केले आणि एकेक करत प्रदेश जिंकले.

रायगड किल्ला ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला.

मराठा साम्राज्य इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. या राज्याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने मोठा भूभाग व्यापला होता.

इ.स. १७६१ हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. इथे झालेल्या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.

१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली.

तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली.

 

 

१७६२ च्या मुख्यतः शीख आणि हिंदूंच्या नरसंहाराने पुन्हा लढा सुरू झाला. पुढे राजा रणजित सिंह यांनी मोठा लढा दिला आणि उत्तरेस एक महत्वाचे राज्य स्थापित केले.

त्यांनी अनेक गुरुद्वारा बांधले आणि काशी विश्वनाथ मंदिर सहित अशा अनेक हिंदू मंदिरांना पुनर्वसन करण्यास मदत केली.

मराठा, शीख या सत्तांसोबत ईस्ट इंडिया कंपनी बऱ्याच दशकांपासून  भारतीय राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध बनवून राहिली. तथापि, जेव्हा ते अधिक स्वार्थी होते तेव्हा भारतीय राजे परत लढाई करीत. १८५७ हे त्याचे मोठे उदाहरण आहे.

ब्रिटिश काळ येईपर्यंत धर्म आणि राजकारण यांचे नाते बऱ्यापैकी दुरावले होते. 

तथापि इंग्राजांचा जाच जसा वाढला तसे भारतीय पुन्हा एकदा लढले. यांत अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. तर अनेक नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी पणाला लावले.

ही आहे भारताच्या लढाईची कथा! भारताच्या सीमा ओलांडणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यांना चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचा ग्रीक लोकांशी लढा, स्कंदगुप्त आणि यशोधरन हुन आक्रमणांचा सामना करीत होते.

पुलकेशीने अरबांना पराभूत केले. विजयनगर साम्राज्य असेल,  हेमु आणि छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले.

 

shivaji-inmarathi

हे ही वाचा – “फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा”

शासकांच्या बरोबरीने आदि शंकराचार्य, रामानुज, माधवाचार्य, तुलसीदास, विवेकानंद असे धार्मिक संत होते ज्यांनी हिंदू पुनर्जागरण करण्यास मदत केली.

ब्रिटिश काळात जेव्हा मिशनरींचा प्रभाव वाढू लागला तेव्हा राजाराम मोहन रॉय यांनी त्याला उत्तर तर दिलेच शिवाय स्वधर्मातही सुधारणेचे पाऊल उचलले.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास विष्णुबुवा ब्रम्हचारी यांच्यासह कित्येकांनी ज्ञान आणि वैचारिकतेच्या जोरावर लढा दिला.

आदि शंकराचार्य यांनी भारताच्या विस्तारानुसार रणनीतिकदृष्ट्या ठेवलेल्या ४ (किंवा ५) प्रमुख केंद्रांची स्थापना करण्याचे स्वप्न पाहिले होते. 

कोणत्याही वेळी बाहेरील व्यक्तीने  मैत्रीपूर्ण आणि सन्माननीय होती तेव्हा आपण त्यांच्याबरोबर काम केले.

जेव्हा कनिष्क किंवा अकबरसारखे परदेशी आपल्या परंपरांचे आदर करतात तेव्हा आपण त्यांचा कायमस्वरूपी वारसा तयार करण्यास मदत केली.

घोर, गझनी, औरंगजेबसारखे आपली संस्कृती नष्ट करण्यास निघाल्यावर आपण परत लढाई केली. आपल्या नष्ट केलेल्या प्रत्येक प्रमुख मंदिराची आपण पुनर्बांधणी केली.

आपल्या लढ्याची ही गोष्ट म्हणजे, इतक्या परकीय आक्रमणानंतर आपला धर्म आणि संस्कृती कशी टिकली या प्रश्नाचे उत्तर आहे.

कारण, आपण सतत संघर्ष करत होतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?