' भारताच्या इतिहासातील आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने न पाहिलेले सुवर्णक्षण!! – InMarathi

भारताच्या इतिहासातील आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने न पाहिलेले सुवर्णक्षण!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी तब्बल १५० वर्षांपूर्वीचे गुलामगिरीचे बंधन तोडून भारताने स्वातंत्र्याची पहाट अनुभवली. अगणित स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने पावन झालेला आपला स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला.

गोऱ्या साहेबांना आपण पिटाळून लावलं, एकीची ताकद त्यांना दाखवून दिली. पण जाता जाता त्या भेद्यांनी आपल्या अखंड घराचे दोन तुकडे केले.

असो, या शुभक्षणी ती कटू आठवण नकोच. तर मंडळी तुम्ही आम्ही काही ते सुवर्णयुग अनुभवलं नाही, तेव्हा नेमके काय ठेवणीतल्या गोष्टी घडल्या होत्या ते आपणास ठावूक नाही, पण तुमच्याही मनात उत्सुकता असलेच ना की काय काय घडले होते तेव्हा, चला तर आज तुमची ही इच्छा आम्ही पूर्ण करतोय.

आज आम्ही तुम्हाला तेव्हाच्या काळाचे काही निवडक आणि दुर्मिळ फोटो दाखवणार आहोत, चला तर पाहुया काय काय उलगडलं जातंय आपल्या समोर!

हा त्या पहिल्या सभेचा फोटो आहे, जेव्हा ८ फेब्रुवारी १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्यविषयक चर्चेसंदर्भात पहिली सभा आयोजित करण्यात आली होती.

 

independence-day-rare-photos-marathipizza01

 

त्या ८ फेब्रुवारी १९४७ च्या नवी दिल्ली येथील सभेमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करताना पंडित जवाहरलाल नेहरू!

 

independence-day-rare-photos-marathipizza02

 

नवी दिल्ली येथे भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचे घोषणापत्र वाचताना भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन

 

independence-day-rare-photos-marathipizza03

 

नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

 

independence-day-rare-photos-marathipizza04

 

खुद्द व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन भारतीय ध्वजाला सलाम करतानाचे एकमेव छायाचित्र! शेवटी साहेबांना सलाम करावाच लागला!

 

independence-day-rare-photos-marathipizza05

 

आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले….!

 

independence-day-rare-photos-marathipizza06

 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी लंडन येथील इंडिया हाउसवर भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकवण्यात आला.

 

independence-day-rare-photos-marathipizza08

 

अंदाजे ९० लाख मुस्लीम लोकांनी फाळणीनंतर पाकिस्तानचा मार्ग स्वीकारला.

 

independence-day-rare-photos-marathipizza09

 

आणि तब्बल ५० लाख हिंदू आणि शीख लोकांनी भारतात नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी भारताचा मार्ग धरला.

 

independence-day-rare-photos-marathipizza10

 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वृत्तपत्रात छापलेली पहिली वहिली बातमी!

 

independence-day-rare-photos-marathipizza07

 

असे हे भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो…जय हिंद….जय भारत!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?