' ….म्हणून ऐश्वर्या चिडली आणि अभिषेकला २ दिवस खोलीबाहेर रहावं लागलं – InMarathi

….म्हणून ऐश्वर्या चिडली आणि अभिषेकला २ दिवस खोलीबाहेर रहावं लागलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेल्या काही वर्षात ‘सेलिब्रिटी कपल’ हा ट्रेंड रुजताना दिसतोय. मग ते आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची उत्सुकता असो वा नुकतीच अनुष्का शर्माच्या कुशीत विसावलेली छोटी पाहुणी असो.

सेलिब्रिटींच्या जीवनात काय घडतं? हा विषय चवीने चघळला जातो. त्यात आपल्या लाडक्या दोन कलाकारांचं सुत जुळतंय हे ऐकल्यावर तर फॅन्सचा आनंद गगनात मावनासा होतो.

जसं दोन सेलिब्रिटीजचं लग्न हा लोकांच्या कुतूहलाचा विषय असतो, तसंच कोणाचं भांडण असेल, तर नेमकं काय घडलं.. पुढे काय घडणार? हे जाणून घेण्यातही लोकांना रस असतो.

बरं.. त्यांनी भांडण सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे अशा आशयाच्या पोस्टही सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात.

बॉलिवूडचं असंच एक लोकप्रिय कपल म्हणजे ‘अभिषेक – ऐश्वर्या’. इंडस्ट्रीमध्ये ते ‘बेस्ट कपल’ म्हणून ओळखले जातात. २००७ साली अभिषेक ऐश्वर्या लग्नाच्या बेडीत अडकले. अगदी थाटामाटात त्यांचं लग्न पार पडलं.

 

aish and abhishek wedding InMarathi

 

अभिषेक आणि ऐश्वर्या इतर कलाकारांच्या मानाने सोशल मीडियापासून बरेच लांब असतात. त्यामुळे त्याच्या ‘कॉन्ट्रोव्हर्सीज’ही फार ऐकू येत नाहीत. त्यांच्यात भांडणं झाल्याच्या चर्चाही कधी रंगत नाहीत.

पण मित्रांनो.. जोडपं म्हटलं की भांडणं ही आलीच. शेवटी ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशा गोष्टी लग्नानंतर घडत असतातच. असंच एक छोटंसं भांडण ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये झालं आणि ऐश्वर्याने चक्क अभिषेकला २ दिवस खोलीबाहेरच ठेवलं.

हाहा… वाचून आश्चर्य वाटलं ना? तुमच्या- आमच्याप्रमाणे कलाकारांच्या आयुष्यातही रुसवे- फुगवे.. भांडणं होतंच असतात की.

हा किस्सा आहे २०१४ सालचा. अभिषेक बच्चनची टीम या वर्षी ‘प्रो कबड्डी लीग’मध्ये जिंकली होती. या टीमच्या ट्रेनिंगसाठी अभिषेक चेन्नईच्या ‘सत्यभामा युनिव्हर्सिटीत गेला होता.

 

abhishek bachchan inmarathi

 

दरम्यान युनिव्हर्सिटीचे फाउंडर कर्नल जेपीआर आणि अभिषेकची भेट झाली. अभिषेक त्यांची भेट घेण्यासाठी ऑफिसवर गेला होता. त्यांचं ऑफिस खूप छोटं होतं आणि जमिनीवर अनेक पारितोषिकं ठेवली होती.

जमिनीवर ठेवलेल्या ट्रॉफीज बघून अभिषेकला आश्चर्य वाटलं आणि न राहवून त्याने कर्नल जेपीआर यांना विचारलं, की ‘तुम्ही ट्रॉफीज जमिनीवर का ठेवल्या आहेत?’

त्यावर हसून कर्नल जेपीआर म्हणाले, की ‘मी नेहमी ट्रॉफीज जमिनीवरच ठेवतो, कारण त्यामुळे माणूस जमिनीवर राहतो. त्याला ग ची बाधा होत नाही.’

अभिषेकला ही कल्पना खूपच आवडली आणि घरी जाऊन त्याने स्वतःच्या आणि ऐश्वर्याच्या ट्रॉफीज जमिनीवर सजवून ठेवल्या. संपूर्ण खोली ही फक्त पुरस्कारांनी भरली होती, ऐश्वर्याला हे बघून भयंकर राग आला.

 

aishwarya rai angry inmarathi

 

अभिषेकने ऐश्वर्याला हे करण्यामागचं कारण सांगितलं, पण ऐश्वर्या भयंकर रागात होती. तिने त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. तिच्या रागामुळे अभिषेकला दोन दिवस खोलीबाहेर राहावं लागलं.

अर्थात, २-४ दिवसांनी त्यांचंही भांडण मिटलंच. शेवटी, नवरा- बायकोची भांडणं ही काही वेळापुरतीच असतात, हो ना?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?